इचलकरंजीच्या ‘त्या’ पेन्शनरांचा वनवास संपला ! १८ मार्चपासून पालिकेची तिजोरी उघडणार!
अहो, काय ही दैवदुर्विलासाची गोष्ट! ज्या हातांनी आयुष्यभर इचलकरंजीच्या गल्ल्या झाडल्या, ज्यांनी साहेबांच्या फायली उचलल्या आणि ज्यांनी या ‘मँचेस्टर’ची सेवा केली, त्या हातांना म्हातारपणी रिकाम्या हाताने फिरावं लागत होतं? ही कसली पालिकेची रीत आणि कसला हा कारभार? पण उशिरा का होईना, इचलकरंजी महानगरपालिकेला अखेर ‘बुद्धी’ सुचली आहे आणि या बिचाऱ्या १७५ कर्मचाऱ्यांच्या भाग्याचा सूर्य १८ मार्चला उगवणार आहे!
महापौरांची ‘धडाकेबाज’ घोषणा !
आमचे महापौर उदयजी धातुंडे यांनी अखेर जाहीर करून टाकलंय की, “बाबांनो, आता काळजी करू नका!” १० कोटी रुपयांचा तो डोंगरासारखा आकडा आता ढळू लागला आहे. १८ मार्चपासून ही देणी टप्प्याटप्प्याने कर्मचाऱ्यांच्या खिशात खुळखुळू लागतील. अहो, याला म्हणतात न्याय! उशिरा मिळाला तरी तो मिळावा, नाहीतर प्रशासनाच्या खुर्च्यांना काय अर्थ?

दाभोळेंचा ‘आक्रमक’ बाणा !
आणि यात कौतुक करायला हवं ते उमाकांत दाभोळे यांचं! भाजपचे हे उपाध्यक्ष म्हणजे जणू कर्मचाऱ्यांचे कैवारीच झाले. त्यांनी प्रशासनाचे कान उपटले, निवेदने दिली आणि ‘जोपर्यंत देणी मिळत नाहीत, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही’ असा पवित्रा घेतला. त्यांच्या या रेट्यामुळेच आज प्रशासन गदगदलं आणि मुख्य लेखा अधिकारी खोळपे यांना कागदं हालवावी लागली!
आता तरी गुलाल उधळा !
मागील अनेक महिन्यांपासून हे निवृत्त कर्मचारी पालिकेच्या पायऱ्या झिजवत होते. कोणाचं पोरीचं लग्न अडकलं असेल, तर कोणाचं औषधपाणी! पण आता टेन्शन घेऊ नका. १८ मार्चला प्रत्यक्ष देयके मिळणार आहेत. इचलकरंजीच्या या कामगारांच्या कष्टाचं चीज होतंय, हे पाहून आम्हा पत्रकारांनाही आज मनापासून समाधान वाटतंय!
मी तर म्हणतो, आता पेन्शनरांनी गुलालाची उधळण करायला हरकत नाही, कारण हा विजय न्यायाचा आहे आणि संघर्षाचा आहे!



























